Thursday, March 25, 2010

पैसा बोलता है!!!

खरं सांगू आज गप्पा मारायचा जाम मूड आहे माझा; पण तेव्हडा रिकामा वेळ आहे कोणाला?
मला स्वतःला काम करायची विशेष आवड नाही आणि आज तर मूड पण नाही बळजबरी काम करण्याचा.
आज निवांत बसून जुन्याच विषयांवर गप्पा माराव्यात म्हणते.
 खरं सांगा तुम्हाला तुमच्या जीवनातला कोणता काळ सगळ्यात रम्य वाटतो? मी सांगू? अर्थात बालपण... नाही का?
परीक्षेशिवाय कसलाही दडपण नाही. चिंता नाही. असली तरी जाणवायची नाही. आता वाटते तशी उगीच वाटणारी तगमग नाही.
 पण गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी...
 मला आता जॉब नाही आणि खरं तर मनापासून इच्छाही नाही.
 मला खर सांगू काय करायला आवडतं... निवांत गप्पा मारायला... फिरायला.... गाणी ऐकायला...कविता लिहायला.... वाचन करायला...
खरच फक्त या कामासाठी मला पैसे मिळाले असते तर.... असाही विचार बराच वेळा मनात येतो.... तुम्हाला नाही वाटत कधी असं?
पण आता या निवांतपणाचाही कंटाळा आलाय.
होतं काय आपण असतो निवांत पण सगळे नसतात त्यावेळी... आणि मग आपली उगीच चीड चीड होत राहते की आपल्याला कोणी वेळ देत नाही. आपल्याला कोणी समजून घेत नाही. समोरच्या व्यक्तीला वाटत असत की हि व्यक्ती काय रिकामीच आहे तिला काय माहिती  आपल्याला किती ताप आहेत ते...  म्हणून मग त्याची चीड चीड...  वैताग...
आता हे सगळं आपल्याला कळत असतं........ पण वळत नाही त्याचं काय........ 

मग या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळवायची तर आपण गुंतून राहणे.
गुंतवून घ्यायचे  अनेक मार्ग आहेत हो पण त्यासाठी परत लागतो तो पैसा.......
म्हणून मग काय तर शेवटी उपाय जॉब......
खरं कस ना आपल जीवन नेहमीच दुस-यावर अवलंबून असतं.
    असो आता माझी गरज आहे स्वतःला गुंतवून घेणं. आणि त्यासाठी आता इंटरविव्यूची तयारी करायचीय. करावीच लागेल कारण बाबानो..शेवटी........
पैसा बोलता है!!!
     

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete