Wednesday, April 28, 2010

क ला काना का!

दमलेल्या बाबाची गोष्ट!

Sunday, April 25, 2010

एक आलेला ई-मेल

माझे उत्तर

राजे सांगून येणार नाहीत....
आले तर परत जाणार नाहीत...
अनुशास्त्रांच्या युगात तलवार घेतील...
इतकेही ते वेडे नाहीत...
दूरदृष्टी त्यांची कधी...
आपल्या ध्यानी येणार नाही....
आता राजे असते तर...
मार्केट आधी काबीज झाले असते...
चलनवाढ होण्याऐवजी पिक पाणी वाढले असते...

  इथे देशाचा विकास म्हणजे आपली प्रगती खुंटते...
शेतीवर सेझ बांधून धान्य टंचाई वाढते...
बायकापोरी बद्दल तुम्ही खरच आदर दाखवता?
  होणा-या अत्याचारावर निषेध तरी नोंदवता...

शंढ समाजाने कधी तक्रार करू नये...
आणि वीर पुरुषाला खरं तर बोलावूही नये...

गेला इतिहास गेला गड्यांनो
कितीदा तोच घोकणार...
इतिहासामधून  खरं..
आपण कधी शिकणार.....
आपला शत्रू आता खरं तर...
आपणच शोधून तुडवला पाहिजे...
आपणच प्रत्येकातून.....
नवीन  "शिवाजी" घडवला पाहिजे.......

"जय भवानी...  जय शिवाजी..."

--स्वरचित

Thursday, April 22, 2010

"राग"

बसल्या बसल्या असाच विचार आला...
"राग" हा एकच शब्द मराठी भाषेत दोन परस्परभिन्न गोष्टींमध्ये कसा काय वापरण्यात आला असावा?
म्हणजे संगीतासारख्या मार्दवपूर्ण कलाकृतीमध्ये वेगवेगळे "राग" असतात....
आणि मानवी जीवनातल्या सहा शत्रुंपैकी एक "क्रोध" म्हणजे "राग"......
.... मराठी भाषाकाराचे हे अजब मिश्रण मला ब-याच वेळा कोड्यात पाडून जाते...
पण एक मात्र खरं की "राग" आला तरच राग कळतो........

अशाच मराठीतल्या तुम्हाला कोड्यात टाकणा-या शब्दांबद्दल ऐकायला निश्चित आवडेल.....

Wednesday, April 14, 2010

FREEDOM IS NOT FREE .... Part III

FREEDOM IS NOT FREE .... Part II

FREEDOM IS NOT FREE .... Part I

काही विचार!3

काही विचार!:2

काही विचार!

Proud to be Indian - Shiv Khera (3 of 3)

Proud to be an Indian - Shiv Khera (2 of 3)

Proud to be an Indian

Shiv Khera Country First

Make India Proud - Proud to be Indian

Wednesday, April 7, 2010

अमृतवेल : वी. स. खांडेकर (...आणि एक प्रश्न )

बरेच दिवस वी. स. खांडेकरांची "अमृतवेल" वाचायची होती.
काल परवा तो योग आला. अगदी एकहाती वाचावी अशी कादंबरी आहे (छोटीही आहे!)
 मानवी जीवन नव्हे आशावादी मानवी जीवन कसे असते आणि कसे असावे याचे अतिशय सुंदर चित्रण या कादंबरीत केले आहे.
दुस-याच्या दुःखात आपले दुःख माणूस कसे विसरून जातो याचे अप्रतिम वर्णन आहे.
दुस-याकडून अपेक्षा करताना स्वतःची कर्तव्ये कशी विसरली जातात.
सूडभावनेपोटी होणारं माणसाचं अधपतन आणि पर्यायाने स्वतःचा नाश हे जीवनाचे जीवनाचे समीकरण सांगितले आहे.
मानवी जीवनातले प्रेम ही भावना कशी व्यापक आहे... ती फक्त नात्यांमध्ये अडकून रहात नाही... ती समदुखी.... समविचारी...  लोकांना बांधून ठेवणारा एक धागा आहे.
त्याला नात्याचे...वयाचे...बंधन नसते...
प्रेम म्हणजे वासना नव्हे किंवा आकर्षण ही नव्हे...
पण समवयस्क लोक असतील तर या प्रेमाला आकर्षणाची किनार मिळणेही स्वाभाविक आहे.
पण म्हणून ते प्रेम  लगेच कलंकित होऊ शकत नाही.
असे प्रेम उदात्त असते. त्यात स्वार्थ नसतो. आणि कुणाचे नुकसानही नसते.
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार आहे.

पण.....
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार मांडता मांडता खांडेकर अचानक या भावनेला परत नात्यातच का गुंतवून टाकतात ते काही काळात नाही....
या भावनेला शेवटी ते बहिण-भावाच्या नात्यात अडकवून टाकतात...... असे का?
या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही.
जर तुम्हाला मिळाले तर..............
मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे

( ता. क.:  पुस्तक जरूर वाचा...... अनेक सुंदर वाक्यांनी सजलेली कलाकृती.... मला आवडलेली वाक्ये लवकरच पोस्ट करणार आहे.)