राजे सांगून येणार नाहीत....
आले तर परत जाणार नाहीत...
अनुशास्त्रांच्या युगात तलवार घेतील...
इतकेही ते वेडे नाहीत...
दूरदृष्टी त्यांची कधी...
आपल्या ध्यानी येणार नाही....
आता राजे असते तर...
मार्केट आधी काबीज झाले असते...
चलनवाढ होण्याऐवजी पिक पाणी वाढले असते...
इथे देशाचा विकास म्हणजे आपली प्रगती खुंटते...
शेतीवर सेझ बांधून धान्य टंचाई वाढते...
बायकापोरी बद्दल तुम्ही खरच आदर दाखवता?
होणा-या अत्याचारावर निषेध तरी नोंदवता...
शंढ समाजाने कधी तक्रार करू नये...
आणि वीर पुरुषाला खरं तर बोलावूही नये...
गेला इतिहास गेला गड्यांनो
कितीदा तोच घोकणार...
इतिहासामधून खरं..
आपण कधी शिकणार.....
आपला शत्रू आता खरं तर...
आपणच शोधून तुडवला पाहिजे...
आपणच प्रत्येकातून.....
नवीन "शिवाजी" घडवला पाहिजे.......
"जय भवानी... जय शिवाजी..."
--स्वरचित
संथ निळे हे पाणी
12 years ago


No comments:
Post a Comment